Monday, May 11, 2020

Dasbodh दासबोध Dashak 1 - Samas 1

Dasbodh दासबोध Dashak 1 - Samas 1
Dasbodh

II  जय जय रघुवीर समर्थ II II श्रीमंत दासबोध II 

दशक  पहिला समास पहिला 

The first dashak of Srimad-Dasbodha is called 'Satvan'. In this first decade, Shri Samarth has emphasized the importance of Sriganesha, in the form of knowledge with constant vigor and strength. Why it is written and what is its 'Falshruti' is stated in the first Samas of this first dashak

II  दासबोध दशक १ - स्तवननाम
     समास १ - मंगलाचरण II 

IIश्री रामसमर्थ IIश्रोते पुसती कोण ग्रंथ I
 काय बोलिले जी येथ Iश्रवण केल्याने प्राप्त काय आहे IIII
मराठी अर्थ - 
श्रोते विचारत आहेत कि, हा कुठला ग्रंथ आहे, यात 
काय सांगितलंय, याच्या श्रवणाने म्हणजेच 
याच्या अभ्यासाने, चिंतनाने, मनाने आम्हाला 
काय लाभ होईल.


ग्रंथा नाम दासबोध I गुरुशिष्यांचा सवांद I 
येथ बोलिला विशद I भक्तिमार्ग  II II
श्री समर्थ उत्तर  देतात कि ,या ग्रंथाचे नांव 
दासबोध आहे आणि त्यात गुरु-शिष्याच्या 
संवादरुपाने  भक्तिमार्ग विवरण करून 
सांगितला आहे. 

नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलि वैराग्याचे लक्षण I
 बहुधा अध्यात्मनिरूपण I निरोपिले IIII
या दासबोध ग्रंथात नवविधा भक्ति, ब्रह्मज्ञान 
आणिवैराग्याचे लक्षण आणि विशेषकरुन 
आध्यात्मनिरुपण विविध ठिकाणी केलेले आहे.

भक्तीचेन योगे देव I निश्र्चये  पावती मानव I
ऐसा आहे अभिप्राव I ईये ग्रंथी IIII
भक्तिमार्गाचा अवलंब करणार्‍यास हमखास 
ईश्वरदर्शनाचा लाभ होतो असा या ग्रंथाचा 
स्पष्ट अभिप्राय आहे .  

मुख्य भक्तीचा निश्र्चयो  I  शुद्धज्ञानाचा  निश्र्चयो  I
आत्मस्थितिचा निश्र्चयो  I बोलिला असे IIII
 मुख्यभक्ति कोणती आहे ,शुद्धज्ञान कोणते आहे 
 आत्मस्थिती कशी असते याचे विवरण केले आहे  

शुद्ध उपदेशाचा निश्र्चयो I संयोज्यमुक्तीचा निश्र्चयो  I 
मोक्ष प्राप्तीचा निश्र्चयो  I बोलिला असे IIII
 शुद्धउपदेश म्हणजे काय,सायुज्यमुक्ति कशाला 
म्हणतात मोक्षप्राप्ति काय असते याचे विवरण 
या ग्रंथात केले आहे.

शुद्ध स्वरूपाचा निश्र्चयो I विदेहस्थितीचा निश्र्चयो  I 
आलिप्तपणाचा निश्र्चयो  I बोलिला असे IIII
शुद्धस्वरुप कसे  असते,  विदेहस्थिती कोणती 
अलिप्तपणा म्हणजे काय असतो याचे विवरण 
केले आहे.  

मुख्य देवाचा निश्र्चयो  I मुख्य भक्ताचा निश्र्चयो  I
 जीवशिवाचा निश्र्चयो  I बोलिला असे  IIII
मुख्यदेव कोणता, उत्तम भक्त कोण, 
जीवशिवस्वरुप या ग्रंथात स्पष्ट सांगितले.  

मुख्य ब्रम्हाचा निश्र्चयो  I नाना मतांचा निश्र्चयो I 
आपण कोण हा निश्र्चयो  I बोलिला असे IIII
मुख्यब्रह्म कसे ,विविध मते कोणती आणि 
आपण स्वतः कोण आहे याचं सुस्पष्ट 
विवरण येथे केले आहे. 

मुख्य उपासना लक्षण I नाना कवित्वलक्षण I
 नाना चातुर्यलक्षण I बोलिले असे II१०II
उपासनेचे मुख्य लक्षण कोणते आहे,विविध 
काव्याची लक्षणं कोणती विविधप्रकारच्या 
चतुरपणाची लक्षणं कशी असतात हे या 
ग्रंथात स्पष्ट सांगितले.   

मायोद्धवाचे  लक्षण I पांचभूतांचे लक्षण I 
कर्ता कोण हे लक्षण I बोलिले असे II११II
मायेच्या उत्पत्तीची लक्षणं कोणती,पंचमहाभूताची 
लक्षणं कोणती आहेत, आणि  या सृष्टीचा
कर्ता  कोण आहे आणि त्याच्या कर्त्याची 
लक्षणं याविषयी या ग्रंथात स्पष्ट सांगितले.  
       
नाना किंत निवारिले I नाना संशयो छेदिले I 
नाना आशंका फेडिले I नाना प्रश्न II१२II
या दासबोधात अनेक शंकांचे निवारण केले 
आहे व अनेक चुकीच्या समजुतीचे निवारण 
केले आहे. अनेक संशय छेदून टाकले आहेत.
आणि अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरे
दिली आहेत.  

ऐसे बहुधा निरोपिले I ग्रंथगर्भी जे बोलिले I
 ते अवघेची अनुवादले I  वचे कि कदा II१३II
   दासबोधाची रचना आणि  दासबोध या ग्रंथाचे 
तात्पर्ययाविषयी  या ग्रंथात स्पष्ट सांगितले. 

 तथापि अवघा दासबोध Iदशक फोडून केला विशदI
 जे जे दशकींचा अनुवाद Iते ते दशकी बोलिलाII१४II
हा संपूर्ण दासबोध वीस दशकात विभागाला 
आहे आणि प्रत्येक दशकाचा विषय त्या त्या
दशकात स्पष्ट सांगितला आहे. 

नाना ग्रंथांच्या समती  I  उपनिषदे वेदांत श्रुती  I 
आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रेसहित II१५II
या दासबॊधामधील विषयास अनेक ग्रंथाचे 
आधार घेतले आहेत त्यामध्ये उपनिषदे आणि 
वेद हे आधार महत्वाचे आहेत आणि आत्मप्रचित
म्हणजे काय हे शास्त्रप्रचितीबरोबरच 
स्वानुभवाचाआधार घेऊन हा ग्रंथ लिहला आहे . 


नाना समतीअन्वये  I  म्हणौनि मिथ्या म्हणंता  नये  I 
तथापि हे अनुभवासि ये प्रत्यक्ष आता  II१६II
अनेक प्रकारचे आधार घेऊन मांडलेला हा 
दासबोध ग्रंथातीलविषय चुकीचे आहेत असे
म्हणता येणार नाही परंतु हे प्रत्यक्ष अनुभवास येते.  


मत्सरे यासी मिथ्या म्हणती   I तरी अवघेचि ग्रंथ उछदती  I 
नाना ग्रंथांच्या समती  I  भगवद्वाक्ये  II१७II
अनेक ग्रंथांचा व भगवद्‍ वचनाचा आधार घेऊन
दासबोधातील विषय मांडलेले आहेत,परंतु मत्सरी
माणसे या विषयमांडणीस खोटा म्हणून
हिणवतातपण तसे असेल तर सर्व
भगवंतांच्या वचनांना खोटे मानावे लागेल.

शिवगीता रामगीता  I गुरुगीता गर्भगिता  I 
उत्तरगीता अवधूतगीता I वेद आणि  वेदांत II१८II
शिवगीता, रामगीता, गुरूगीता, गर्भगीता, उत्तरगीता अवधूतगीता 
इत्यादि अनेक ग्रंथाचा आधार घेऊन हा  दासबोध ग्रंथ लिहिला आहे. 

भगवद्गीता ब्रह्मगीता I  हंसगीता पांडवगीता  I 
गणेशगीता यमगीता  I उपनिषेद भागवत II१९II 
भगवद्गीता ,ब्रह्मगीता , हंसगीता ,पांडवगीता  
गणेशगीता,यमगीता ,उपनिषेद भागवत इत्यादि 
अनेक ग्रंथाचा आधार घेऊन हा  दासबोध 
ग्रंथ लिहिला आहे

इत्यादिक नाना ग्रंथ I  समतीस बोलिले येथ   I
भगवद्वाक्ये यथार्थ I  निश्र्चयेसी II२०II
इत्यादि अनेक ग्रंथाचा आधार घेऊन हा  दासबोध ग्रंथ लिहिला आहे
विविध विषयाची स्वरूप असणारी भगवंताची वचणे घेतली आहेत.  

भगवद्वचनी अविस्वासे Iऐसा कोण पतित असे I
भगवद्वाक्याविरहित नसे I बोलणे येथीचें II२१II
या ग्रंथात जे सांगितले आहे ते भगवंताच्या मतास 
अनुसरून लिहिले आहे आणि भगवंताच्या 
सांगण्यावर  विश्वास न ठेवणारा असा हीन
 माणूस कोणी असेल असं वाटत नाही. 

पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण I  उगाच ठेवी  जो दूषण  I
तो दुरात्मा दुराभिमान I  मत्सरे करी  II२२II
एखादा ग्रंथ पूर्ण अभ्यासल्याशिवाय जो त्याला 
उगीचच नावे ठेवतो ,तो दुष्ट बुद्धीचा असतो 
केवळ मत्सराने द्वेष करीत असतो. 

अभिमान उठे मत्सर I  मत्सरे ये तिरस्कार  I
पुढे क्रोधाचा विकार I  प्रबळे बळे II२३II
 दुराभिमानामुळे मत्सर, मत्सरापोटी तिरस्कार
 निर्माण होतो आणि त्यातून क्रोधाचा विचार प्रगटतो.

ऐसा अंतरी नासला I  कामक्रोध खवळला  I
अहंभावे पालटला I  प्रत्यक्ष दिसे  II२४II
अशारीतीने मन विकृत होऊन कामक्रोध 
खवळलेले असतात आणि अंतरंगात तो 
नासक्या मनःस्थितीतजाऊन पोहचतो 
हे जगात प्रत्यक्षआढळून येते. 

कामक्रोध लिथाडिला तो कैसा म्हणावा भला
     अमृत सेवितांच पावला मृत्य राहो  II२५II
कामक्रोधाने बरबटलेल्या माणसास भले कसे
 म्हणावे , कामक्रोधग्रस्त राहू अमृत पिऊन
 अमर होण्याऐवजी तो मरून गेला .


आतां असो हे बोलणें अधिकारासारिखें घेणें
परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम  II२६II
आता हे बोलणे पुरे करतो, आपली कुवत असेल 
तेवढेच त्याने दासबोधातून घ्यावे, पण ते त्याने 
अहंकार बाजूस सारून ते घ्यावे हे सगळ्यात
 उत्तम होय . 

मागां श्रोती आक्षेपिलें जी ये ग्रंथी काय बोलिलें
 तें सकळही निरोपिलें संकळीत मार्गे  II२७II
या ग्रंथात काय सांगितले आहे ? असा प्रश्न 
श्रोत्यांनी सुरवातीला विचारला होता याचे 
आतापर्यंत थोडक्यात ऊत्तर दिले.  

आतां श्रवण केलियाचें फळ क्रिया पालटे तत्काळ
तुटे संशयाचें मूळ  येकसरां  II२८II
दासबोधाच्या अभ्यासाने साधकाच्या वागणे  
एकदम बदलते , त्याच्या मनांतील सारे संशय
 मिटून साधा सोपा असा मार्ग सांपडतो. 

मार्ग सांपडे सुगम नलगे साधन दुर्गम
सायोज्यमुक्तीचें वर्म ठाइं पडे II२९II
ईश्वर दर्शनाचा सोपा व सुखाचा मार्ग सापडतो जेणे करून कठिण
 साधना न करता सायुज्यमुक्तिचं रहस्य सहासपणे हाती येते .  

नासे अज्ञान दु: भ्रांतीशीघ्रचि येथे ज्ञानप्राप्ती
ऐसी आहे फळश्रुती ईये ग्रंथीं  II३०II
अज्ञान, दुःख, खोट्या समजुती नाश पावून 
त्यास ज्ञानप्राप्ति होते, असे  या ग्रंथाचे खरे 
 फळ आहे. 

योगियांचे परम भाग्य आंगी बाणे तें वैराग्य
चातुर्य कळे यथायोग्य विवेकेंसहित  II३१II
योगी पुरुष वैराग्याला मोठे भाग्य समजतात 
ते वैराग्य माणसाच्या हाती बाणते.अंतरंगात 
विवेक प्रगटतो, व्यवहारातील चातुर्याने 
कसे वागावे ते समजतं.

भ्रांत अवगुणी अवलक्षण तेचि होती सुलक्षण
धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती  II३२II
भ्रांत म्हणजे चुकीच्या कल्पना आणि हीन 
लक्षणं असतीलतर ती जाऊन तो उत्तमगुणांचा 
होतो, धूर्त अर्थात चतुर होतो, तर्क चालवून 
विचक्षण म्हणजे हुशारीने सूक्ष्म विचार करु 
लागतो,वेळप्रसंगाची त्याला चांगली जाण येते.

आळसी तेचि साक्षपी होती पापी तेचि प्रस्तावती
निंदक तेचि वंदूं लागती भक्तिमार्गासी  II३३II
आळशी माणसे  उद्योगी होतात. पापी माणसना 
पश्चातापहोतो व ते सुधारतात, भक्तिमार्गाची
 निंदा करणारी माणसेआदराने भक्ति करू लागतात . 

बद्धचि होती मुमुक्ष मूर्ख होती अति दक्ष
अभक्तचि पावती मोक्ष भक्तिमार्गे  II३४II
जे प्रपंची गुंतून पडलेले  लोकं आहेत ते मुमुक्षु 
म्हणजे अध्यात्ममार्गाची वाट धरतात, मूर्ख 
अर्थात अज्ञानी लोकसावध होतात आणि जे 
अभक्त असतात ते भक्तिमार्गाची कास 
धरून मोक्षमार्गाने वाटचाल करु लागतांत.

नाना दोष ते नासती पतित तेचि पावन होती
प्राणी पावे उत्तम गती श्रवणमात्रे  II३५II
अशा रीतीने या ग्रंथाच्या अभ्यासाने नाना प्रकारचे
दोष नष्ट  होऊन माणूस पावन होतो व अपवित्र  
माणसे पवित्र  होतात.माणसाला उत्तम गती प्राप्त होते.

नाना धोके देहबुध्दीचे नाना किंत संदेहाचे  
नाना उद्वेग संसाराचे  नासती श्रवणें  II३६II
“मी देह आहे’ या समजुतीमुळे येणारे अनेक 
कठिण प्रसंगदासबोधाच्या अभ्यासाने ते 
सगळे टळतात. संशयामुळेनिर्माण होणारे अनेक 
प्रकारचे भ्रम नाहीसे होतात.संसारातीलदुःखाचे 
अनेक प्रसंग याना सामोरे जाण्याची कुवत येते.

ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती
मनास होय विश्रांती समाधान II३७II
दासबोधकच्या अभ्यासाने मिळणारी हि 
फळश्रुती असून माणसाच्यामनाला खरी
विश्रांती,समाधान व शांति याची प्राप्ति होते

जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा
मत्सर धरी जो पुसा तयास तेंचि प्राप्त  II३८II
अभ्यास करणाऱ्याची मनोवृत्ती जशी असेल 
तसेच त्याला फळ  मिळेल.मत्सरग्रस्त पुरुषास
तसेच म्हणजे त्याच्या विचारासारखेच फळ मिळेल.

आता या दासबोधाचे प्रयोजन म्हणजेच “महत्वाची मोक्षप्राप्ती” ही फलश्रुतीच्या रुपाने अनुक्रमें समासाअखेरपर्यंत म्हणजेच दासबोधातील २८व्या ओवीपासून ३८व्या ओवीपर्यंत स्पष्ट केली आहे, ज्यांना आत्महित साधावयाचे आहे त्यांनी दासबोधाचा निश्चित अर्थ गुरुमुखातून जाणून घ्यावा, असं हंसराजस्वामी यानी संकेत कुबडीत ओवी१-८ मध्ये म्हंटलं आहे.

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मंगलाचरणनाम समास पहिला IIII




1 comment:

Dasbodh दासबोध Dashak 1 Samas 10

॥   जय जय रघुवीर समर्थ ॥ ॥ श्रीमंत दासबोध ॥ दशक पहिला समास दहावा Samarth says in this Samasa that when this male body is found, so...