॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ ॥श्रीमंत दासबोध ॥
दशक पहिला समास सहावा
Samarth has explained to the readers that there will be all kinds of people among the readers of Dasbodha in this Samas. In Dasbodha, there is a beautiful combination of spiritual heroism and practical realism. He has preached to the people in such a straightforward, simple and straightforward manner based on conscience, emphasizing on effort, enlightenment, perseverance. The manifestation of his independent intellect and deep faith in his thinking takes place in this samas.
समर्थानी या समासात दासबोधाच्या वाचकांमध्ये सर्व प्रकारचे लोक असतील हे जाणून वाचकांना परमात्मास्वरुप समजून सांगितले आहे. दासबोधात अध्यात्मिक ध्येयवाद आणि व्यावहारिक वास्तववाद यांची सुंदर सांगड श्रीसमर्थांनी घातलेली आहे. विवेकावर आधारित अशी सरळ, साधी व सोपी मांडणी करून प्रयत्न, प्रबोध, प्रचिती यावर भर देत लोकांना समर्थानी उपदेश केला आहे. त्यांच्या स्वतंत्र प्रज्ञेचं आणि विचारविवेकावरील गाढ श्रद्धेचं दर्शन या समासात घडतं.
II दासबोध दशक १ - स्तवननाम
समास ६ - श्रोतेस्तवन II
॥श्रीराम॥
आतां वंदूं श्रोते जन | भक्त ज्ञानी संत
सज्जन | विरक्त योगी गुणसंपन्न | सत्यवादी ||१||
येक सत्वाचे सागर | येक बुद्धीचे आगर |
येक श्रोते वैरागर | नाना शब्दरत्नांचे ||२||
जे नाना अर्थामृताचे भोक्ते | जे प्रसंगीं वक्तयाचे
वक्ते | नाना संशयातें छेदिते | निश्चै पुरुष ||३||
ज्यांची धारणा अपार | जे ईश्वराचे अवतार |
नातरी प्रत्यक्ष सुरवर | बैसले जैसे ||४||
किं हे ऋषेश्वरांची मंडळी | शांतस्वरूप सत्वागळी |
जयांचेनि सभामंडळीं | परम शोभा ||५||
हृदईं वेदगर्भ विलसे | मुखीं सरस्वती विळासे |
साहित्य बोलतां जैसे | भासती देवगुरु ||६||
जे पवित्रपणें वैश्वानर | जे स्फूर्ति किरणाचे
दिनकर | ज्ञातेपणें दृष्टीसमोर | ब्रह्मांड नये ||७||
जे अखंड सावधान | जयांस त्रिकाळाचें ज्ञान |
सर्वकाळ निराभिमान | आत्मज्ञानी ||८||
ज्याचे दृष्टीखालून गेले | ऐसे काहीच नाही उरले |
पदार्थमात्रांसी लक्षिलें | मनें जयांच्या ||९||
जें जें कांहीं आठवावें | तें तें तयांस पूर्वीच ठावें |
तेथें काये अनुवादावें | ज्ञातेपणेंकरूनी ||१०||
परंतु हे गुणग्राहिक | म्हणौन बोलतों निःशंक |
भाग्य पुरुष काये येक | सेवीत नाहीं ||११||
सदा सेविती दिव्यान्नें | पालटाकारणें आवेट
अन्नें | तैसींच माझीं वचनें | पराकृतें ||१२||
आपुले शक्तिनुसार | भावें पुजावा परमेश्वर |
परंतु पुजूं नये हा विचार | कोठेंचि नाहीं ||१३||
तैसा मी येक वाग्दुर्बळ | श्रोते परमेश्वरचि
केवळ | यांची पूजा वाचाबरळ | करूं पाहे ||१४||
वित्पत्ती नाही कळा नाही | चातुर्य नाही प्रबंध नाही |
भक्ति ज्ञान वैराग्य नाहीं | गौल्यता नाहीं वचनाची ||१५||
ऐसा माझा वाग्विलास | म्हणौन बोलतों सावकाश |
भावाचा भोक्ता जगदीश | म्हणौनियां ||१६||
तुम्ही श्रोते जगदीशमूर्ति | तेथें माझी वित्पत्ती
किती | बुद्धिहीन अल्पमती | सलगी करितों ||१७||
समर्थाचा पुत्र मूर्ख जगीं | परी सामर्थ्य असे त्यांचे
आंगीं | तुम्हां संतांचा सलगी | म्हणौनि करितों ||१८||
व्याघ्र सिंह भयानक | देखोनि भयचकित लोक |
परी त्यांचीं पिलीं निःशंक | तयांपुढें खेळती ||१९||
तैसा मी संतांचा अंकित | तुम्हां संतांपासीं बोलत |
तरी माझी चिंता तुमचे चित्त | वाहेलच कीं ||२०||
आपलेची बोले वाउगे | त्याची संपादणी करणे लागे |
परंतु काहीं सांगणें नलगे | न्यून तें पूर्ण करावें ||२१||
हें तों प्रीतीचें लक्षण | स्वभावेंची करी मन |
तैसे तुम्ही संतसज्जन | मायेबाप विश्वाचे ||२२||
माझा आशय जाणोनि जीवें | आतां उचित तें करावें |
पुढें कथेसि अवधान द्यावें | म्हणे दासानुदास ||२३||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
श्रोतेस्तवननाम समास सहावा || ६ ||
No comments:
Post a Comment